Tuesday, August 16, 2016

डॉ . बाबासाहेबांनी लिहिलेला स्त्री मुक्तीचा जाहीरनामा म्हणजे हिंदू कोड बिल ......

Savita Baviskar
डॉ . बाबासाहेबांनी लिहिलेला स्त्री मुक्तीचा जाहीरनामा म्हणजे हिंदू कोड बिल ......
स्त्रीने बालपणी वडिलांच्या आज्ञेत राहावे , तरुणपणी पतीच्या आणि म्हातारणी किंवा पतीच्या मृत्यूनंतर मुलाच्या आज्ञेत राहावे .
अशा प्रकारे परंपरेने स्त्रीला कायमच जोखडून ठेवले होते . आणि ह्या जोखडातून ह्या चौकटीतून स्त्रीला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी " हिंदू कोड बिल " लिहिले .बाबासाहेब त्यावेळी कायदेमंत्री होते .त्यांनी सतत अविरत कष्ट घेऊन हे बिल तयार केले होते . स्त्रियांना कायद्याने हक्क ,दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची हाच उद्देश त्यांचा होता तो बाबासाहेबांनी ह्या बिलाच्या स्वरूपात मांडला .
हिंदू कोड मध्ये 7 कलमे महत्वाचे त्यांनी मांडले होते .
*जी व्यक्ती मृत्युपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत व्यक्तीच्या मालमत्तेच्या हक्कांबाबत
* मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार
*पोटगी
*विवाह
* घटस्फोट
* दत्तकविधान
*अज्ञानत्व व पालकत्व
ह्या सातहि विषय स्त्रियांच्या दृष्टीने किती महत्वाचे आहेत ते आपल्याला चांगलेच ठाऊक आहे .
इथे आपण उदा देऊ --
* 'नवरा 'हाच देव मानणाऱ्या स्त्रिया आहेत नवऱ्याने कसेही वागवले तो कसाही व कितीही वाईट असला तरीही त्याच्यासोबत जीवन जगत राहावे . कारण तो पुरुष आहे त्याला सर्व मुभा होती परंतु स्त्री ही हतबल होती , तिला घटस्फोट घेण्याची मुभा नव्हती . ते स्वातंत्र्य ह्या बिलात देण्यात आले होते .
* त्याचप्रमाणे नवरा मेल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीची मालकी त्या स्त्रीला मिळण्यास आजवर बंधने होती ती बंधने ह्या बिलात काढून टाकण्यात आली होती .
तसेच बाप मेल्यावर भाऊ प्रॉपर्टीची वाटणी करून घेतात तर त्या भावाबरोबर त्यांच्या बहिणीला सुद्धा वाटणी मिळावी अशी तरतूद ह्या बिलात करण्यात आली होती .
* आंतरजातीय विवाह करावयाचा झाल्यास , किंवा परजातीतील मुलगा दत्तक घ्यायचा असल्यास तशी तरतूद ह्या बिलात केली होती
एकूणच सर्वता हे बिल स्त्रियांच्या हिताचे व सुखाचे बिल होते परंतु हे बिल पास होऊ नये ह्यासाठी विरोधकांनी बिलाला विरोध केला .त्यात सामील होते , डॉ. राजेंद्र प्रसाद , शंकराचार्य , ब्रम्हानंद सरस्वती , स्वामी करपात्री , डॉ. पट्टाभि सितारा मय्या या या नेत्यांनी बिलाला विरोध केला . कारण हे बिल म्हणजे समाजातील परंपरांचे सावट होते . हा कायदा स्त्रीला सबळ, सक्षम आणि तिची स्वतःची ओळख निर्माण करणारा होता .
परंतु स्त्रीयांनीच ह्या बिलाविरुद्ध ताशेरे ओढले बिलाला पाठिंबा द्यायचं तर सोडा त्यांनी हे बिल पास होऊ नये म्हणून एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या कडे गेले आणि हे बिल चांगले नाही असे सांगितले .त्यावर बाबासाहेबांनी त्या शिष्टमंडळातील दोघी तिघीना प्रश्न केला की ,तुम्ही हे बिल वाचले का , न वाचताच तुम्ही विरोध का करताय . त्यावर त्या म्हणाल्या आमच्या नवऱ्याने सांगितले आहे की तू बिलाला विरोध कर अन्यथा मी दुसरी बायको करून घेतो . म्हणून सवत पत्करण्यापेक्षा आम्ही बिलालाच विरोध करणे आम्हाला भाग आहे .अशा प्रकारे स्त्रियांच्याच हतबलते मुळे या बिलाचा घात झाला .जर स्त्रियांच्या पायात ताकद असती तर हे बिल नक्कीच पास झाले असते .परंतु ते बारगळे
बाबासाहेब एक उदाहरण देत म्हणतात ..
एखाद्या स्त्रीने दुधात विरजण घालून ठेवावे आणि तिला ते विरजण शेवटी नासले असल्याचे दिसावे , तशी स्थिती माझ्या हिंदू कोड बिलाची झाली .
पुढे ते म्हणतात की, इंग्लडमधील स्त्रीयांनी तर मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी चळवळ केल्या होत्या कारण त्या जागरूक होत्या त्यांच्यात ती हिम्मत होती ताकद होती .
पुढे ह्या बिलावर तीव्र टीका झाली आणि डॉ.राजेंद्र प्रसाद म्हणाले की जर हे बिल लोकसभेत पास झाले तर त्याला माझी अनुमती मिळणार नाही .आणि त्यांचं हे वक्तव्य ऐकून नेहरूंनीही बिलाच्या बाबतीत उत्सुकता दाखविली नाही .
आणि म्हणून बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला .त्यांनी फक्त संपूर्ण स्त्रीयांच्या साठी हा त्याग केला . केवढा मोठा त्याग होता हा बाबासाहेबांचा
बाबासाहेब म्हणाले स्त्रियांनी आपल्या हक्कासाठी न्याय मिळवण्यासाठी चळवळीत पुढे आले पाहिजे .
! जयभीम ! !! जयभारत !! !!! नमो बुद्धाय !!!

No comments:

Post a Comment